Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रिजनल न्यूज

श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा होणार कायापालट ; कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

xtreme2day   13-06-2026 21:47:57   68934620

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावीच्या दगडाची विधीवत पुजा आणि ब्रह्मध्वजारोहण

 

श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा होणार कायापालट ; कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 

पुणे/ श्रीक्षेत्र भीमाशंकर (विशेष प्रतिनिधी) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्याने बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसेच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आले. यानंतर त्यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सुरू असलेल्या मंदिर परिसर विकास आणि हेरिटेज वाडी प्रकल्पाची केली.  यावेळी त्यांनी कामाची गती गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. पुढील वर्षी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी या प्रकल्पातील सुमारे ९० टक्के काम पूर्ण होईल, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पाच्या जागेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसन प्रक्रिया तसेच स्थानिकांसाठी प्रस्तावित सुविधांची याबाबतची माहिती त्यांनी घेतली. 'हेरिटेज वाडी' पाहण्यासाठी पर्यटक येतील असं गाव होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

 

 श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पाच्या जागेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसन प्रक्रिया तसेच स्थानिकांसाठी प्रस्तावित सुविधांची याबाबतची माहिती त्यांनी घेतली. 'हेरिटेज वाडी' पाहण्यासाठी पर्यटक येतील असं गाव होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

 

त्यांच्या समवेत आमदार दिलीप वळसे-पाटील, बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, वन विभागाचे अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पाहणीदरम्यान प्रकल्पातील विविध घटक, पुनर्वसन प्रक्रिया, स्थानिकांच्या अपेक्षा तसेच भाविकांसाठी प्रस्तावित सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. भीमाशंकरच्या धार्मिक आणि पर्यावरणीय महत्त्वाचा विचार करून विकास आणि संवर्धन यांचा समतोल राखत प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

 

‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा, भाविकांसाठी दर्जेदार सुविधा आणि पर्यटन विकासाला चालना मिळेल आणि परिसराचे परिवर्तन घडून येईल, असा विश्वास यावेळी श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. 

 

ग्रामस्थानी प्रकल्पासाठी केलेल्या सहकार्याचा मुख्यमंत्र्यांनी विशेष उल्लेख केला. परिसरातील १५० घरांना इतरत्र जागा देऊन चांगल्या गावाची रचना करण्यात येत आहे, जेणेकरून भाविक मंदिरासोबत गावातही जातील आणि गावाची अर्थव्यवस्था बदलेल. रस्ते, ज्येष्ठ नागरिकांसाठी विद्युत वाहन, दुकानांची रचना, बस स्थानक आदींचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. इथे करण्यात येणाऱ्या सुविधेमुळे भाविकांची संख्या वाढेल, असेही श्री. फडणवीस म्हणाले. 

 

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रकल्पाची माहिती दिली. ते म्हणाले, भीमाशंकर गावाचे नियोजित पुनर्वसन, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि स्थानिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मूळ गावापासून अवघ्या १५० मीटर अंतरावर सुमारे १०.५ एकर क्षेत्रात ‘हेरिटेज वाडी’ विकसित करण्यात येणार असून त्यामध्ये पारंपरिक वास्तुशैली आणि आधुनिक सुविधांचा समन्वय साधण्यात येणार आहे.

 

स्थानिकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ४० हून अधिक व्यावसायिक युनिट्सची तरतूद करण्यात आली आहे. ‘विस्थापनाऐवजी पुनर्रचना’ या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प असून ग्रामस्थांचे सामाजिक व सांस्कृतिक नाते अबाधित ठेवत जवळच्या परिसरातच पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’मध्ये वारसा प्रवेशद्वार, ग्रामपंचायत कार्यालय, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. ‘लाइव्हलीहुड अपग्रेडेशन’ संकल्पनेअंतर्गत नव्या वसाहतीचे नियोजन भाविक व पर्यटकांसाठी सेवा केंद्र म्हणून करण्यात येत असून त्यामुळे स्थानिकांना पर्यटनाशी संबंधित विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, मंदिर परिसरातील जवळपास १०० टक्के रहिवाशांचे नियोजनबद्ध पुनर्वसन करण्यासाठी ‘झिरो फ्रिक्शन मॉडेल’चा अवलंब करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे राबविता येतील.

यावेळी आमदार दिलीप वळसे- पाटील , बाबाजी काळे काळे , जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

कमी कालावधीत उत्कृष्ट दर्जाचे काम  केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला देशभरात मोठी मान्यता असून या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पात मूळ मंदिराचा सभामंडप, त्याचा जीर्णोद्धार आणि परिसर विकासाची कामे अतिशय वेगाने सुरू आहेत. मंदिर परिसर विकासाच्या माध्यमातून भीमाशंकरचे संपूर्ण रूप पालटणार आहे. यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. 

 

हेरिटेज वाडी प्रकल्पाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, सुमारे दीडशे घरे नव्या ठिकाणी स्थलांतरित होत असून या नागरिकांसाठी शेजारीच आधुनिक सुविधांनी युक्त नवीन गाव उभारण्यात येत आहे. हे गाव केवळ पुनर्वसनापुरते मर्यादित राहणार नसून तेथील अर्थव्यवस्थेलाही नवी दिशा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

 

परिसरातील वाहतूक व्यवस्थेबाबतही महत्त्वपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. जाण्यासाठी आणि येण्यासाठी स्वतंत्र रस्ते तयार केले जात असून त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी इलेक्ट्रिक वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. दुकाने, बसस्थानक आणि इतर सार्वजनिक सुविधा सुव्यवस्थित पद्धतीने विकसित केल्या जात असून भाविक आणि स्थानिक व्यावसायिक या दोघांच्याही हिताचा विचार करण्यात आल्याचे श्री. फडणवीस यांनी नमुद केले.

 

या सर्व विकासकामांमुळे भविष्यात भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या पाच ते दहा पट वाढेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी कामाबाबत समाधान व्यक्त केले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती