Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 स्पेशल स्टोरी

यंदा भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आणि मध्य अफ्रिका तसेच अमेझॉनचं संपूर्ण जंगल अल निनोच्या प्रभावाखाली येणार; 150 वर्षांनंतर जगावर मोठं संकट

xtreme2day   22-04-2026 20:33:18   395237609

यंदा भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आणि मध्य अफ्रिका तसेच अमेझॉनचं संपूर्ण जंगल अल निनोच्या प्रभावाखाली येणार; 150 वर्षांनंतर जगावर मोठं संकट

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - प्रशांत महासागरच्या पृष्ठभागाचं तापमान झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा तीव्र प्रभाव पहायला मिळू शकतो असा इशारा हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. यावर्षीचा अल निनो हा मेगा किंवा सुपर असू शकतो, अशी माहिती देखील हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. अल निनोची सुरुवात ही प्रशांत महासागरात होते, मात्र त्यानंतर त्याचा प्रभाव हा हळुहळू संपूर्ण जगावर पडतो. यंदा भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आणि मध्य अफ्रिका तसेच अमेझॉनचं संपूर्ण जंगल अल निनोच्या प्रभावाखाली येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे जगावर मोठं संकट निर्माण झालं आहे.

 

यंदा संपूर्ण जग एका मोठ्या भीषण संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे.एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. 1877-78 मध्ये अशीच घटना घडली होती, ज्या घटनेनं संपूर्ण जगात हाहाकार उडाला होता, त्याची पुनरावृत्ती 2027 मध्ये घडू शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. मोठ्या नैसर्गिक अपत्तीचे संकेत मिळत आहेत. जगभरातील हवामान तज्ज्ञांकडून यंदाच्या मान्सूनबाबत धडकी भरवणारा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदाच्या मान्सूनवर अल निनोचं सावट आहे. यंदाचा अल निनो एवढा शक्तिशाली आहे की, यापूर्वी अशी घटना 1877 मध्ये घडली होती. 1877 मध्ये संपूर्ण जगात भीषण दुष्काळ पडला होता, त्या वर्षभरात दुष्काळामुळे अनेक लोकांचे मृत्यू झाले. त्यानंतर पुन्हा अशा कोणत्याही दुष्काळाची नोंद झाली नाही. मात्र यावर्षी तशाच स्वरुपाच्या अल निनोचा प्रभाव पावसावर पडण्याचा अंदाज जगभरातील हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.

 

यंदा भारतासह राज्यातील मान्सूनवर अल निनोचं सावट असणार आहे. याचा मोठा फटका हा पावसाला बसू शकतो. अल निनोमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे. दरम्यान संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तयारीला सुरुवात झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत संबंधित विभागांना आवश्यक त्या -सूचना करण्यात आल्या आहेत.

 

विशेष वृत्त

 

'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सज्ज-*डॉ.  किरण पाटील

 

पुणे - राज्यात वाढत्या तापमानाची शक्यता व उष्णलहरींचा धोका लक्षात घेता, पशुसंवर्धन विभागाने राज्यातील पशुपालक, कुक्कुटपालक व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. वाढत्या उष्णतेमुळे पशुधनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी विभागाने सर्व पशुवैद्यकीय संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, पशुपालकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

 

उष्णलहरींच्या काळात पशुधनाची कशी काळजी घ्यावी व याबाबत क्षेत्रिय स्तरावर काय जनजागृती करण्यात यावी, याबाबत पशुसंवर्धन विभागाने मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून अधिनस्त संस्थाप्रमुखांना अवगत केले  आहे. तसेच पशुपालकांना मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून पशुधनाची काळजी घेण्याबाबत आवाहन केले आहे. यामध्ये, पशुधनाला पुरेसे स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. आहारात क्षार मिश्रणे व जीवनसत्वांचा समावेश करावा. दुभत्या जनावरांना संतुलित आहार द्यावा. 

 

शेतीच्या किंवा वहनाच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या पशुधनाला सकाळी ११ ते सायंकाळी ४ या तीव्र उन्हाच्या काळात विश्रांती द्यावी. त्यांना सावलीत किंवा खेळती हवा असलेल्या थंड जागी बांधावे. गोठ्याचे छत उष्णता रोधक असावे किंवा छतावर गवत/पालापाचोळा टाकून त्यावर पाणी मारावे. शक्य असल्यास स्प्रिंकलरचा वापर करावा. खिडक्यांना सावलीची व्यवस्था असावी. उष्णलहरी सुरू होण्यापूर्वी घटसर्प, फऱ्या व आंत्रविषार यांसारख्या रोगांचे प्रतिबंधक लसीकरण व जंतनाशक औषधे पाजणे आवश्यक आहे.

 

तातडीच्या उपाययोजना व उपचार:

 

पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे (उदा. धापा टाकणे, तोंडावाटे लाळ गळणे, अस्वस्थता) दिसून आल्यास त्वरित तात्काळ सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवावे. पशुधनावर थंड पाण्याचा मारा करावा. (अश्ववर्गीय प्राण्यांच्या बाबतीत पायाकडून शरीराच्या वरील भागाकडे पाणी मारावे). जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. पशुसंवर्धन विभागाने सर्व क्षेत्रीय संस्थांना हवामान विभागाच्या संपर्कात राहून दैनंदिन तापमानाचा अंदाज घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व दवाखान्यांमध्ये आवश्यक जीवरक्षक औषधे, व औषधी साठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आला आहे. फिरती पशुवैद्यकीय पथके तातडीच्या सेवेसाठी तैनात ठेवण्यात आली आहेत.

 

पशुसंवर्धन विभागाने जिल्हा प्रशासन, अशासकीय संस्था, तसेच सामाजिक-सेवाभावी संस्थांना आवाहन केले आहे की, रस्त्यावरील पशू-पक्ष्यांसाठी घराबाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची भांडी,हौद ठेवावेत. मृत पशुधनाची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी स्थानिक प्रशासनाने योग्य जागा आरक्षित ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. 

 

*उष्णलहरींच्या काळात काय करावे?* पशुधनासाठी नेहमी स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सोय करावी. पिण्याची भांडी नियमित स्वच्छ ठेवावीत. पिण्याचे पाण्याचे हौद शक्यतो गोठ्याजवळ व सावलीत असावेत. नसल्यास त्यावर शेड उभारून थेट उन्हापासून संरक्षण करावे. चारा, वैरण व पशुखाद्याचा पुरेसा साठा करून ठेवावा. खाद्यात मिनरल मिक्श्चरचा समावेश करावा. उत्पादक व दुभत्या पशुधनास संतुलित आहार द्यावा. गाभण पशुधनाच्या खाद्य व चाऱ्याची काळजी घ्यावी. आधुनिक गोठ्यांमध्ये 'स्प्रिंकलर' वापरावेत. इतर पशुपालकांनी पशुधनाच्या अंगावर पाणी फवारावे. म्हशींना शक्य असल्यास स्वच्छ पाण्याच्या हौदात बसण्याची सोय करावी. सायंकाळच्या दूध दोहनाची वेळ टप्प्याटप्प्याने किमान १ तास उशिरा ठेवावी, जेणेकरून उष्णतेचा ताण कमी होऊन उत्पादन टिकून राहील. 

 

पशुधनाला सावलीत व भरपूर खेळती हवा असलेल्या जागी बांधावे. निवाऱ्याच्या छतासाठी उष्णता रोधक साहित्याचा वापर करावा. पक्षीगृहाच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. जाळ्यांना पडदे लावून त्यावर पाणी शिंपडावे व हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी. शेती किंवा ओझे वाहणाऱ्या पशुधनाला सकाळी ११ ते दुपारी ४ या तीव्र उन्हाच्या काळात पूर्ण विश्रांती द्यावी. उष्णतेपासून वाचवण्यासाठी अश्वाला त्याच्या  पायाकडून शरीराच्या वरील भागाकडे थंड पाण्याचा हळुवार शिडकावा करावा. वराहांना पुरेसा निवारा, स्वच्छ पाणी व शक्य असल्यास पाण्यात बसण्याची सोय करावी. पाळीव प्राणी/पशूंना उन्हाच्या वेळी शक्यतो घरात किंवा सुरक्षित निवाऱ्यात ठेवावे. मृत पशुधनाची विल्हेवाट लावण्याची जागा सार्वजनिक ठिकाणे व पाणवठ्यांपासून दूर व सुरक्षित असावी. तिथे तसा सूचना फलक लावावा. स्थानिक हवामानाचा अंदाज व दैनंदिन तापमानावर नियमित लक्ष ठेवावे.

 

*उष्णलहरींच्या काळात काय करू नये :* पशुधन उन्हाळ्यात उघड्यावर बांधू नये. पाळीव पशुधनास पार्क केलेल्या गाडीत सोडून जावू नये. शेती विषयक व इतर कामासाठी वापरण्यात येणा-या पशुधनास उन्हाच्या वेळी कामास लावू नये. पशुधनास पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात फार दूर व फार वेळ चालावे लागू नये याची दक्षता घ्यावी. पशुधनाची गर्दी करू नये. दाटीवाटीने बांधु नये. भर उन्हात पशुधनाची हलचाल / वाहतुक करू नये. उन्हे असल्यास दुभत्या पशुधनाचे दोहन करून नये. मृत पशुधन उघड्यावर टाकू नये.

 

*डॉ.  किरण पाटील, आयुक्त पशुसंवर्धन विभाग:* "एल निनोच्या संकटकाळात पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. चारा व्यवस्थापन व पशुधनाच्या आरोग्याबाबत कोणत्याही मदतीसाठी स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. तसेच '१९६२ कॉल सेंटर'च्या माध्यमातून पशुसंवर्धनविषयक सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
👔🪙 Your balance is 36,824.44 $$. Next 👉🏿 graph.org/BALANCE-3682444-USD-04-21?hs=650ddb6a1bb31a599da0ebd16b6a4cf6& 👔🪙 23-04-2026 04:41:16

zt5pot


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती