राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षानिमित्त विश्वशांती आणि समृद्धीसाठी समरस आणि संघटित समाज निर्माण करण्याचा केला संकल्प
xtreme2day
25-03-2025 21:26:29
34907980
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षानिमित्त विश्वशांती आणि समृद्धीसाठी समरस आणि संघटित समाज निर्माण करण्याचा केला संकल्प
बंगळुरू (विशेष प्रतिनिधी) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शताब्दी वर्षानिमित्त विश्वशांती आणि समृद्धीसाठी समरस आणि संघटित समाज निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. डॉ. हेडगेवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले हे कार्य गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने अधिक बळकट झाले. दैनिक शाखेच्या माध्यमातून समाजाचा दृढ विश्वास संपादित करणाऱ्या संघाने सर्वसमावेशक राष्ट्रनिर्माणाचा संकल्प केला आहे. सर्व घटकांना एकत्र आणून एकात्मिक आणि प्रगतीशील भारत निर्माण करण्याचे हे ध्येय आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्ताने संघाने एक मोठा संकल्प केला आहे. विश्वशांती आणि समृद्धीसाठी समरस आणि संघटीत समाजाची निर्मिती करण्याचा संकल्प राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला आहे. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत पत्रकार परिषद घेऊन या संकल्पाची माहिती देण्यात आली. अनंत काळापासून हिंदू समाज एक प्रदीर्घ आणि अविस्मरणीय प्रवासात साधनारत आहे. संघाचे मुख्य उद्देश्य मानव एकता आणि विश्व कल्याण आहे. तेजस्वी मातृशक्ती, संत, धर्माचार्य आणि महापुरुषांचा आशीर्वाद आणि कर्तृत्वामुळे आपले राष्ट्र अनेक उतार-चढावांनंतरही निरंतर प्रगती करत आहे, असं संघाने म्हटलं आहे.
काळाच्या प्रवाहात राष्ट्र जीवनातील अनेक दोष दूर करून भारताला एक संगठित, चारित्र्यसंपन्न आणि सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून परम वैभवापर्यंत नेण्यासाठी डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघकार्याचं बीजारोपण करत असताना डॉ. हेडगेवार यांनी दैनिक शाखेच्या रूपात व्यक्तिमत्व निर्माण करण्याची एक अनोखी कार्यपद्धती विकसित केली. ही कार्यपद्धती आपल्या सनातन परंपरांतील मूलभूत मूल्यांवर आधारित राष्ट्रनिर्माणाचा नि:स्वार्थ तप बनली. डॉ. हेडगेवार यांच्या जीवनकाळातच या कार्याचा एक राष्ट्रव्यापी विस्तार झाला. दुसरे सरसंघचालक पूज्य गुरुजी (माधव सदाशिव गोलवलकर) यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राष्ट्रीय जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये शाश्वत चिंतनाच्या प्रकाशात कालानुसार आणि युगानुकूल रचनांची प्रक्रिया सुरू झाली, असं संघाने म्हटलं आहे.
शतकांच्या या प्रवासात संघाने दैनिक शाखेतील संस्कारांद्वारे समाजाचा दृढ विश्वास आणि प्रेम प्राप्त केलं आहे. या कालखंडात संघाच्या स्वयंसेवकांनी प्रेम आणि आत्मीयतेच्या आधारावर मान-अपमान आणि राग-द्वेषाच्या पलीकडे जाऊन, सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. संघकार्याच्या शताब्दीच्या पार्श्वभूमीवर, आम्ही पूज्य संत, समाजाच्या सज्जन शक्ती, ज्यांच्या आशीर्वाद आणि सहयोगामुळे प्रत्येक परिस्थितीत संघ मजबूत राहिला, जीवन समर्पित करणारे नि:स्वार्थ कार्यकर्ते आणि मौन साधनेस रत असलेले स्वयंसेवक कुटुंब यांचे स्मरण करावे, असं आवाहन करण्यात आलं.
आपल्या प्राचीन संस्कृती आणि समृद्ध परंपरेमुळे भारताला सौहार्दपूर्ण जग निर्माण करण्याचा अनुभवजन्य ज्ञान प्राप्त आहे. आपला चिंतन विभेदकारी आणि आत्मघाती प्रवृत्तींना दूर ठेवून चराचर जगात एकत्वाची भावना आणि शांतीची खात्री करतो. संघाचे असे मानणे आहे की, धर्माच्या अधिष्ठानावर आत्मविश्वासाने परिपूर्ण संगठित सामूहिक जीवनाच्या आधारावरच हिंदू समाज आपल्या जागतिक कर्तव्यांचा प्रभावीपणे निर्वाह करू शकेल.. म्हणूनच, आपले कर्तव्य आहे की, आम्ही सर्व भेदभाव नाकारणारे समरसतेने परिपूर्ण वर्तन, पर्यावरणपूरक जीवनशैलीवर आधारित मूल्याधिष्ठित कुटुंब, ‘स्व’बोधाने ओतप्रोत आणि नागरिक कर्तव्यासाठी प्रतिबद्ध समाज निर्माण करण्यासाठी संकल्प करू. याच आधारावर, समाजाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे, आव्हानांचा सामना करत, भौतिक समृद्धी आणि आध्यात्मिकता यांचे मिश्रण असलेले समर्थ राष्ट्रनिर्माण करू शकेल. अखिल भारतीय प्रतिनिधी सभा सज्जन शक्तीच्या नेतृत्वाखाली संपूर्ण समाजाला सोबत घेऊन, जगापुढे उदाहरण ठरणारा समरस आणि संघटित भारत निर्माण करण्यासाठी संकल्प करत आहे.
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारा संदर्भात आवाज उठविणारा ठराव मंजूर केला आहे, संघाला १०० वर्षे पूर्ण होताना हा ठराव मंजूर झाला आहे. सहकार्यवाह म्हणाले की डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना करताना जसे म्हटले होते की संघा काही नवीन कार्य सुरु करीत नाही तर अनेक शतकांपासून चालू असलेल्या कार्याला पुढे नेत आहे.
1. शताब्दी वर्षाची सुरुवात विजयादशमी २०२५ च्या निमित्ताने होणार असून यावेळी गणवेशातील स्वयंसेवक संघ आपआपल्या मंडळ,खंड,नगर स्तरावर कार्यक्रम आयोजित करतील. दरवर्षी प्रमाणे यंदाही सरसंघचालक स्वयंसेवकांना संबोधित करतील.
2. नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत तीन आठवडे मोठ्या स्तरावर घरोघरी संपर्क मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्याचे नाव “हर गांव, हर बस्ती, घर-घर” असे आहे. या दरम्यान संघाचे साहित्य वितरण केले जाणार असून स्थानिक शाखांद्वारा कार्यक्रम आयोजित केले जातील.
3. सर्व मंडळे आणि वस्त्यांमध्ये हिंदू संमेलन आयोजित केली जातील.कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येकाच्या जीवनात एकता आणि सद्भभाव,राष्ट्राच्या विकासात सर्वांचे योगदान आणि पंच परिवर्तनात प्रत्येक व्यक्तींनी सहभाग घ्यावा असा संदेश दिला जाईल.
4. खंड- शहर स्तरावर सामाजिक सद्भभाव बैठकांचे आयोजन केले जाईल. ज्यात एकत्र येऊन रहाण्यावर जोर दिला जाणार आहे. या बैठकांचा उद्देश्य सांस्कृतिक आधार आणि हिंदू चरित्राला न विसरता आधुनिक जीवन जगण्याचा संदेश दिला जाईल.त्यांनी यावेळी महाकुंभचे उदाहरण दिले, जेथे सर्व क्षेत्रातील लोक एकत्र आले होते.
5. सह कार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी सांगितले की जिल्हा स्तरावर प्रमुख नागरिक संवाद आयोजित केले जातील. या कार्यक्रमात राष्ट्रीय विषयांवर योग्य तथ्य आणि प्रचलीत चुकीचे समज दूर करण्यावर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे.
6. युवकांसाठी विशेष कार्यक्रम प्रांतांद्वारा आयोजित केले जातील. १५ ते ३० वयोगटातील तरुणांसाठी राष्ट्र उभारणी, सेवा उपक्रम आणि पंच परिवर्तन यावर लक्ष केंद्रित करणारे कार्यक्रम आयोजित केले जातील. स्थानिक मंडळांद्वारा आवश्यकेते नुसार कार्यक्रमाची योजना तयार केली जाईल.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.