Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 वर्ल्ड न्यूज

ग्रह संरेखन - अद्भूत योग ; येत्या 28 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री सूर्यमालेतील सर्व सात ग्रह एकत्र !!

xtreme2day   24-02-2025 23:10:43   46753250

ग्रह संरेखन - अद्भूत योग ; येत्या 28 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री सूर्यमालेतील सर्व सात ग्रह एकत्र !!

 

महाकुंभ श्री प्रयागराज नगर (विशेष प्रतिनिधी) - एकाच वेळी काही ग्रह एकाच रेषेत असणे असामान्य नाही, परंतु सर्व ग्रह एकाच रेषेत असणे ही नक्कीच एक दुर्मिळ घटना आहे. या आश्चर्यकारक खगोलीय घटनेला ग्रह संरेखन म्हणतात. 28 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री सूर्यमालेतील सर्व सात ग्रह एकत्र दिसतील. सर्व ग्रह सूर्याभोवती वेगवेगळ्या कक्षेत फिरतात, परंतु ग्रहांच्या कक्षा वेगवेगळ्या असतात. ज्यामुळे ते एका सरळ रेषेत दिसत नाहीत. जेव्हा पृथ्वीसह इतर ग्रह सूर्याच्या एका बाजूला येतात तेव्हा ते आकाशात एका सरळ रेषेत दिसतात. अवकाशात एकाच दिवशी एका ओळीत सात ग्रह दिसणार आहे. या काळात, शनि, बुध, नेपच्यून, शुक्र, युरेनस, गुरू आणि मंगळ हे सातही ग्रह एका सरळ रेषेत एकत्र दिसतील. शास्त्रज्ञांनी या खगोलीय घटनेचे वर्णन एक दुर्मिळ ग्रह योगायोग म्हणून केले आहे.

अंतराळात अनेकदा आश्चर्यकारक खगोलीय घटना पाहायला मिळतात. खगोलशास्त्रीय घटनांमध्ये रस असलेल्यांसाठी येणारा दिवस खूप खास असणार आहे. प्रत्यक्षात, एका ओळीत सात ग्रह दिसतील. या काळात, शनि, बुध, नेपच्यून, शुक्र, युरेनस, गुरू आणि मंगळ हे सातही ग्रह एका सरळ रेषेत एकत्र दिसतील. शास्त्रज्ञांनी या खगोलीय घटनेचे वर्णन एक दुर्मिळ ग्रह योगायोग म्हणून केले आहे. खगोलशास्त्रीय घटनांमध्ये रस असलेल्यांसाठी आणि सामान्य लोकांसाठी ही एक अद्भुत घटना असेल. हे देखील विशेष आहे कारण सात ग्रह एकत्र दिसणे फारच दुर्मिळ आहे. सहसा एकाच वेळी काही ग्रह सूर्याच्या एकाच बाजूला असतात, परंतु सर्व ग्रह एकाच वेळी एका सरळ रेषेत असणे दुर्मिळ आहे.

या सर्वच ग्रहांच्या सरळ रेषेत येण्याचा हा कार्यक्रम जानेवारीपासून सुरू आहे आणि 8 मार्चपर्यंत सुरू राहील. 28 फेब्रुवारी रोजी सर्व सात ग्रह एकत्र दिसतील. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, ही घटना खूपच दुर्मिळ आहे आणि पुढील 15 वर्षे ती पुन्हा दिसणार नाही. यानंतर, ग्रहांची अशी परेड फक्त 2040 मध्येच पाहता येईल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ग्रहांची परेड पाहण्यासाठी प्रकाशापासून दूर असलेल्या मोकळ्या मैदानात जाणे चांगले राहील. जर हवामान स्वच्छ असेल तर युरेनस आणि नेपच्यून वगळता सर्व ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येतात. युरेनस आणि नेपच्यून पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता असेल. तज्ज्ञांच्या मते, पूर्वेला मंगळ, आग्नेय दिशेला गुरु आणि युरेनस, तर पश्चिमेला शुक्र, नेपच्यून आणि शनि दिसतील. 

 

दरम्यान, जगातील सर्वात मोठा मेळा असलेल्या महाकुंभ अर्थात भक्तीचा मेळा प्रयागराजमध्ये रंगला. प्रयागराजमध्ये श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा संगम पहायला मिळाला. कुंभमेळ्यात 45 दिवस त्रिवेणी संगमात लाखो भाविकांनी डुबकी मारली. महाकुंभात स्नान आणि उपासना केल्याने विलक्षण पुण्य प्राप्त होते, अशी अख्यायिका आहे. आता पाप धुवायला 144 वर्ष वाट पहावी लागणार आहे. 2169 मध्ये होणार पुढचा महाकुंभ होणार आहे. 

 

हिंदू धर्मात कुंभमेळा आणि महाकुंभ यांचे पौराणिक महत्त्व आहे. कुंभमेळा दर 12 वर्षांनी हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज या ठिकाणी होतो. ग्रहांची स्थिती आणि धार्मिक मंत्रांचा जप भक्तांना आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवतो, असं म्हणतात. म्हणुन केवळ भारतातूनच नाही तर जगाभरातून भाविक इथे येत असतात. महाकुंभ हा केवळ आध्यात्मिक सोहळा नसून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कामही करतो. ज्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक सौहार्दाची देवाणघेवाण होते. त्यामुळे कुंभ संतांसह भाविकांसाठी ही पर्वणीच असते. 26 जानेवारी 2025 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी कुंभमेळ्यात शेवटचे अमृत स्नान  होणार आहे. महाकुंभ दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो. दर 12 वर्षांनी 12 वेळा कुंभमेळा भरल्यानंतर, महाकुंभ 144 वर्षांनी आयोजित केला जातो. या मान्यतेनुसार 2169 मध्ये पुढचा महाकुंभ मेळावा भरणार आहे. 12 वर्षांनंतर, पुढील कुंभमेळा 2027 मध्ये नाशिकमध्ये आयोजित केला जाईल. त्यानंतर 2028 मध्ये उज्जैनमध्ये सिंहस्थ महाकुंभ आयोजित केला जाणार आहे. कुंभमेळ्याचा मुख्य उद्देश आत्मशुद्धी आणि मोक्षप्राप्तीशी संबंधित आहे. 

2039 मध्ये, प्रयागराजमध्ये पुन्हा एकदा अर्धकुंभमेळा भरणार आहे. तर 2041 मध्ये, कुंभमेळा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर) येथे होणार आहे. हा नियमित कुंभमेळा असेल. 2044 मध्ये, प्रयागराजमध्ये पुन्हा एकदा अर्धकुंभमेळा आयोजीत केला जाणार आहे. 2047 मध्ये, हरिद्वारमध्ये महाकुंभमेळा आयोजीत केला जाणार आहे. 2050 मध्ये चार शहरांच्या चक्राची परंपरेनुसार कुंभमेळा पुन्हा नाशिकमध्ये भरणार आहे.भगवान विष्णूंच्या आज्ञेनुसार देव आणि दानवांनी समुद्रमंथन केलं. अमृत मिळवण्यासाठी हे  समुद्रमंथन करण्यात आले. समुद्रमंथनावेळी देव आणि दानवांची समेट घडवून आणून अमृतकुंभ मिळवण्यात यश मिळाले. समुद्रमंथनाच्या वेळी अमृताचे चार थेंब पृथ्वीवर पडले, असं सांगितलं जातं.... हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिकमध्ये हे चार थेंब पडले, असं मानलं जातं. म्हणूनच या चार ठिकाणी कुंभमेळा होतो.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
wTQbOAOThNZ 25-02-2025 06:17:39

xtreme2day.com
bVsIuUGxIhtKe 26-02-2025 08:17:49

xtreme2day.com
🔑 We send a transfer from unknown user. Gо tо withdrаwаl =>> https://graph.org/GET-BITCOIN-TRANSFER-02-23-2?hs=d43ac98bfd0b55b937c68a99ec625bc9& 🔑 26-02-2025 17:03:29

qx5ssg

xtreme2day.com
BHLqiltus 27-02-2025 04:06:53

xtreme2day.com
🔐 + 1.928646 BTC.GET - https://graph.org/Message--17856-03-25?hs=d43ac98bfd0b55b937c68a99ec625bc9& 🔐 08-04-2025 20:32:11

rad2mz


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती