Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 तामिळनाडू

महाराष्ट्रासारखं तामिळनाडूत घडलं; अण्णा द्रमुक पक्षात पडली उभी फूट,अर्ध्यापेक्षा जास्त आमदार गेले विजय यांच्या TVK पक्षाकडे!

xtreme2day   12-05-2026 21:53:09   10824445

महाराष्ट्रासारखं तामिळनाडूत घडलं; अण्णा द्रमुक पक्षात पडली उभी फूट,अर्ध्यापेक्षा जास्त आमदार गेले विजय यांच्या TVK पक्षाकडे! 

 

बंगळुरू (विशेष प्रतिनिधी) - बहुमत चाचणीच्या एकदिवस आधी विजय यांच्यासाठी गुड न्यूज आहे. तामिळनाडूच्या अण्णा द्रमुक पक्षात फूट पडली आहे. निम्म्यापेक्षा जास्त आमदार विजय यांच्या बाजूने गेले आहेत. बहुमत चाचणीच्या बरोबर एकदिवस आधी AIADMK आणि AMMK च्या आमदाराने विजय यांना पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं आहे. AIADMK चे वरिष्ठ नेते सीवी शनमुगम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या 30 आमदारांनी TVK ला आपलं समर्थन देण्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय टीटीवी दिनाकरन यांचा पक्ष AMMK चे आमदार कामराज हे सुद्धा विजय यांना पाठिंबा देतील.

 

 

दोन दिवसांपूर्वीच TVK पक्षाचे प्रमुख थलपती विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.118 हा बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली. आता विजय यांना तामिळनाडूच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्याआधी त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. तामिळनाडूच एका मोठ्या पक्षात फूट पडली आहे. त्याचा थेट फायदा विजय यांना होणार असून त्यांचं सरकार अधित सुरक्षित होणार आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या सदस्यांपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा त्यांना मिळू शकतो अशी माहिती मिळाली आहे. 

 

 

मुख्यमंत्री विजय यांनी बुधवारी विधानसभेत बहुतम सिद्ध करावं लागणार आहे. TVK कडे स्वत:च्या 107 जागा आहेत. काँग्रेसचे 5 आमदार, डाव्यापक्षांचे दोन-दोन आमदार, वीसीके, मुस्लिम लीगच्या दोन-दोन जागा यांच्या बळावर विजय यांनी सरकार बनवलं आहे. आता AIADMK चे 30 आमदार सोबत आल्याने विजय यांचं सरकार अजून मजबूत झालं आहे. “माझा पक्ष तोडण्याचा त्यांचा इरादा नाहीय. मी जनतेच्या जनादेशाचा सन्मान करतोय. जनतेने विजय यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मतदान केलं आहे. आम्ही त्या जनादेशाचा सन्मान करतो” असं टीवीकेला समर्थन देण्याच्या मुद्यावर शनमुगम म्हणाले. मागच्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. AIADMK पक्षाला 47 जागा मिळाल्या. पक्षाच्या 30 आमदारांनी TVK ला पाठिंबा दिल्याने एडप्पादी के पलानीस्वामी यांच्याकडे फक्त 17 आमदार राहिले आहेत. शनमुगम यांच्या बाजूने असलेल्या आमदारांनी एस.पी.वेलुमणी यांना विधिमंडळ पक्षाचं नेता निवडलं आहे. जी. हरि यांची उपनेता म्हणून निवड केली आहे. EPS गट द्रमुक सोबत मिळून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत होता असं शनमुगम म्हणाले. “AIADMK ची स्थापना DMK सारख्या वाईट शक्तीला संपवण्यासाठी झाली आहे. आम्ही DMK सोबत हातमिळवणी केली असती तर आमचा पक्ष संपला असता. आमचे आमदार आणि कार्यकर्ते या विरोधात होते” असं शनमुगम् म्हणाले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती